काही अनोळखी माणसं आयुष्यात येतात तरी कशाला...
ओळखीचे होऊन जीवाचे नाते बनवतात तरी कशाला...
बेरंग उदासलेल्या आयुष्यात रंग भरतात तरी कशाला...
हरवलेल्या स्वप्नांना पुन्हा वाट दाखवतात तरी कशाला....
चार पाऊले सोबत चालून पुन्हा सोडून जातात तरी कशाला...
क्षणभर आनंद देवून कायमचे दु:खी करून जातात तरी कशाला...
ओळखीचं हे नात क्षणात अनोळखी वाटत तरी कशाला......
काही अनोळखी माणसं आयुष्यात येतात तरी कशाला...
~Rohini
